Skip to main content

या स्वातंत्र्यचे काय होईल?

या स्वातंत्र्यचे काय होईल? तो आपले स्वातंत्र्य रक्षण करील कि पुन्हा गमावून बसेल ? हा माझ्या मनात पहिला प्रश्न उभा राहतो . भारत पूर्वी कधी स्वतंत्र देश नव्हता असे नाही . परंतु येथे असा मुद्दा उपस्थित होतो कि , त्याला एकेवेळी स्वातंत्र्य होते पण तो ते गमावून बसला . तो आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा गमावेल काय?देशाच्या भवितव्याबद्दल मला जास्त चिंताक्रांत करणारा हा प्रश्न आहे.  माझ्या मनाला जास्त टोचणी  जिची लागलेली आहे ती गोष्ट हि की  , भारताने आपले जे स्वातंत्र्य पूर्वी एकदा गमावले ते हिंदुस्थानच्या काही रहिवासांच्या कपटी कारस्थनामुळे ! हे सत्य हृदयाला असह्य वाटू लागते. महंमद बिन कासीम याने सिंधवर जेव्हा स्वारी केली तेव्हा सिंधचा राजा दाहीर यांच्या सेनापतींनी महंमद बिन कासिमच्या हस्तकांनी दिलेल्या लाचा स्वीकारल्या आणि दहार राज्याच्या बाजूने लढण्यास नकार दिला . भारतावर चाल करून येण्याचे आणि पृथ्वीराजाच्या विरुद्ध लढाई करण्याचे आमंत्रण जयचांदणे महंमद घोरीला दिले आणि या कार्यात मी स्वतः व सोळंकी घराण्यातील राजे तुला मदत करू असे जयचंदाने महंमद घोरीला आश्वासन दिले . शिवाजी महाराज हिंदूंच्या स्वातंत्र्यासाठी लढत असताना मराठे सरदार आणि राजपूत राजे हे मोगल बादशाच्या बाजूनेच लढत होते. ब्रिटिश लोक शिख राजांचा निःपात करण्यात करण्यात गुंतलेले होते , तेव्हा शिखांचा प्रमुख सेनापती हा स्थब्ध बसला ब्रिटिशनच्या तावडीतून राजपूत राजांना सोडविण्याचा त्याने काडीमात्र प्रयत्न केला नाही . १८५६ मध्ये भारतातील बऱ्याच भागांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला असता शीख लोक बघ्यासारखे वागत होते . भारताच्या इतिहासात या ज्या घडामोडी झाल्या त्याची पुनरावृत्ती होईल कि काय या विचारानेच माझे काळीज चर्र होते. जातीभेद आणि धर्मभेद हे आपले जुने शत्रू आहेत .नवीन नवीन निरनिराळे ध्येये पुढे जे राजकीय पक्ष उत्पन्न झालेले आहेत व होणार आहेत यांची आता आपल्या जुन्या शत्रूंमध्ये भर पडणार आहे ही जाणीव माझ्या मनाला झाली असल्यामुळे आपल्या देशाचा भविष्यकाळ कसा काय जाणार याची मला जास्त चिंता वाटू लागलेली आहे . हिंदी लोक आपल्या पक्षाच्या मतप्रणालीपेक्षा आपल्या देशाला जास्त महत्व देत आहेत कि आपल्या पक्षाच्या मतप्रणालीला जास्त महत्व देणार आहेत मला सांगता  येत नाही पण एवढे  मात्र खास की जर निरनिराळे पक्ष आपल्या देशापेक्षा आपल्या मतप्रणालीला जास्त महत्व देतील तर आपले स्वातंत्र्य पुन्हा दुसऱ्यांदा संकटात सापडेल आणि कदाचित कायमचेच नष्ट होईल .असेल संकट आपणावर येऊ नये यासाठी आपण सर्वानी जय्य्त तयारी ठेवली पाहिजे . आपल्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपण सावतंत्राचे  संरक्षण प्राणपणाने करू असा आपण दृढ निश्चय केला पाहिजे . 

#WhatIRead
From अंधारातील दीपस्तंभ 

Comments

Popular posts from this blog

मी म्हणजे कोण असा सवाल मी जगाला करत आहे .

मी म्हणजे कोण असा सवाल मी जगाला करत आहे . ।।धृ ।। मी म्हणजे कोण मातृत्व जपणारी आई  का नाक्या वर उभी राहून देह विकरणारी बाई.।।१।। मी स्त्री चे स्त्रीत्व जपणारी , तुम्ही मात्र घाणेरड्या नजरा चिटकवून स्त्रीत्व साजरा करणारे करंटी  . ।।२।। मी स्त्री म्हणून अपमानित  होते. सायांकळी मात्र जनता  माझ्या नग्न देहाची गुलाम होते .।।३।। मी एक  स्त्री म्हणून कोणाची प्रियसी होते . ती मात्र विकृत समाजाची रखेल बनते .।।४।। मी स्त्रीचे स्त्रीपण रुबाबात मिरवते .  ती मात्र स्त्री पणाला दोष देत पोटाची भूक भागवते.।।५।। मी सोन्या चंदीच्या अलंकाराने देहाला नटवते .  ती मात्र तिचा देह  घाणेरड्या नजरा आणि शिव्यांनी सजवते. ।।६।। मी प्रेम वासनेचे आयुष्य जगते  ती मात्र वासनेच्या आगीत स्वतःच्या शरीराची राख करते ।।७।। मी क्षणभरची  कामुक्ता आवडीने जोपासते .  ती मात्र समाजमान्य बलात्काराला आपलेसे करते ।।८।। शेवटी मी आणि ती एकाच ठरते  म्हणून जगाला ओरडून विचारते ... सांगा मी कोण आहे . 

शाळेतील प्रेम शाळेतच राहील

शाळेतील प्रेम शाळेतच राहील  शाळा सुटली पण मन शाळेच्या आठवणीत  रुजलं .  पहिले शाळा सुरु झाली कि डोळ्यात अश्रू दाटून यायचे  आता मात्र अश्रुंनीच शाळेचे सुख अनुभवायचे . ।।१।। शाळा भरली कि तिच्या सहवासात रमायचं  शाळा सुटली कि  तिच्या आठवणीत जगायचं . ।।२।। शाळेत विषयाच्या तासाला कंटाळा करायचा .  पण प्रेमाच्या तासात अवर्जून भाग घ्यायचा. ।।३।। नजर चुकवून तिच्या कडे बघायचे.  पण तिला समजताच हृदयाचे ठोके वाढायचे. ।।४।। शाळेत अवघड गणिताच कोड मात्र सुटले .  परंतु हृदय मात्र  तिच्या प्रेमाच्या कोड्यात अडकून पडले . ।।५।। शाळेत असताना हिंमत मात्र कधी झाली नाही .  हवी असलेली नाती शाळेच्या आठवणीत राहून गेली ।।६।। तिला समजण्याच्या आधीच शाळा ही  सुटली .  तिच्या आठवणीने मात्र  हृदयात प्रेमाची शाळा  भरली . ।।७।। समजले असेल कदाचित पण मनातलं सांगायचे राहील  म्हणूनच कदाचित शाळेतील प्रेम शाळेतच राहील . ।।८।।

ON Reading

ON Reading I hear all the time that people are reading less and less these days. Perhaps there is more distraction, more gadgets, our lives are too busy to find a quiet corner and savour a book. Yet, this is a habit that we need to keep alive in ourselves and inculcate in the future generation. Reading is to the mind what a good meal is to the body. It sustains, it nourishes, it helps us think, it helps us grow . I have for years spoken about a few simple thi ngs we can d o in our homes and around us to keep this habit alive. I hope you will agree w ith my suggestion and try to implement some of them.  * Build Home libraries. Gather books in one and twos and slowly build up a collection. Keep this library as a gift for the future generation, filling it with beautiful meaningful books.  * Read with your children. If you are a parent, keep aside some part of the day when you sit with your children and read together. it could be the same book that you read together, o