Skip to main content

"एक सुंदर विचार"

"एक सुंदर विचार"  



असा कसा तुमचा देव जो बोकडाला लालची आहे पण त्याच्या बरोबर गाडगे बाबांचे फार छान उद्धरण आहे.गाडगे बाबा तीस वर्ष पंढरीच्या वारीला आषाडी आणि कार्तिकी ला गेले पण एकदाही देवळात गेले नाही.एकदाही आषाडी आणि कार्तिकीचा उपवास केला नाही.लोकांनी खराब केलेला चंद्रभागेच्या किनारा स्वतःच्या झाडू ने ते साफ करायचे संध्याकाळी कीर्तनाला उभे राहायचे समोर हजारो माणसे असाची आणि बाबा त्यांना विचारायचे देव पहिला का देव ?....लोकांना वाटायचे ..त्या वेळी बाबांचे एवढे नाव झालेले नव्हते अरे हा माणूस ..आम्ही पांढरीच्या पांडुरंगाला भेटायला आलोय आणि आम्हाला विचारतो देव पहिला का देव ?...लोक म्हणायचे पहिला जी .बाबा म्हणायचे कमाल आहे तुम्ही देव पहिला तुमचा देव कोठे राहतो ?...लोकांना वाटायचे याला  काहीच माहिती नाही लोक म्हणायचे आमचा देव देवळात राहतो, तो रंगाने सावळा आहे ,तो विटे उभा आहे ,त्याचे कटीवर हात आहेत, त्याच्या बाजूला रखुमाई आहे .बाबा म्हणायचे कमाल आहे तुमचा देव देवळात राहतो .माझा  देव माज्या मनात राहतो तरी लोकांना काही कळायचे नाही  मग आपल्या मिश्किल वराडी शैलीत बाबा असे म्हणायचे " तुम्हाले देवाले अंगोळ करते कि नाही लोक म्हणायचे करते तर बाबा म्हणायचे तूम्हाले देवाले अंगोळ कोण घालते ?..लोक म्हणायचे आम्हीच घालतो जी ..मग बाबा म्हणायचे अरे जे तुमचे देवाले स्वतःचे अंगोळ स्वताले करता येत नाही तो तुम्हाला तुमच्या भाग्याची अंगोळ काय घालणार .मग बाबा विचारायचे तुम्हाले देवाले  धोतर नेसते कि नाही ?लोक म्हणायचे नेसते तर बाबा म्हणायचे तुम्हाले देवाले धोतर कोण नेसवते ?लोक म्हणायचे आम्हीच नेसवतोजी बाबा म्हणायचे  जे तुमचे देवाले स्वतःचे नेसूचे धोतर स्वताले नेसता येत नाही ती तुम्हाले भाग्याचे वस्तरे काय देणार पुढे बाबा विचारायचे.  
तुम्हाले  देवाले नेवेद्य दाखवते कि नाही ?..लोक म्हणायचे दाखवते बाबा म्हणायचे नेवेद्य दाखवून काय करते? ..लोक म्हणायचे नेवेद्य च्या बाजूला काठी घेऊन बसते बाबा विचायचे कशाला? लोक म्हणायचे देवाले वाढलेले नेवेद्य कावळा कुत्रा खायला आला तर त्याला काठी ने हाकायला बाबा म्हणायचे जे  तुमचे देवाले तेच्या साठी  वाढलेले नेवेद्य चे स्वतःचे स्वताले रक्षण करता येत नाही तो तुमच्या आयुष्याचे रक्षण रे काय करणार .पुढे बाबा एक लाख मोलाचा प्रश्न विचारायचे "जिता जागता देव कोणी पहिला का  जिता जागता देव ?आणि मग कावराबावरा होऊन लोक इकडे तिकडे पाहायला लागायचे  कारण तो आपण पाहिलेला नसतो .गाडगे बाबा च्या बाजूला एक माणूस उभा असायचा रापलेला चेहरा जडे भरडे खादीचे कपडे पांढरी शुभ्र दाडी पाय अनवाणी त्याच्या कडे बोट दाखवत बाबा म्हणायचे अरे हे भाऊराव पाटील बघा हे महारा मांगाच्या पोरांना शिकवण्याचे काम करते त्याले देव म्हणा.

 अरे अडाण्या ला शिक्षण द्यावे, बेघराला घर द्यावे ,रंजल्या गांजल्याची सेवा करावी ,मुक्या प्राण्यावर दया करावी .बापहो देव याच्यात राहतो बापहो देव देवळात राहत नाही देव आपल्या मनात राहते देवळात मात्र पुजारायचे पोट राहते.



by DR Narendra dabholkar 







Comments

Popular posts from this blog

शाहिरी अभंग गाते ( नितीन चंदनशिवे.)

 छाया नागजकरांच्या तमाशात नाचणारी पुष्पां लोंढे ही एकदा पुण्यात आली आणि आवर्जून मला भेटली.स्वारगेटला आमची भेट झाली तेव्हा पुष्पाने रमेशबद्दल सांगितलं आणि मी हादरून गेलो.रमेश गेल्या सहा महिन्यांपासून झोपून आहे.त्याची बायको त्याला सोडून गेली आहे.तुझी सारखी आठवण काढत असतो.सात आठ पत्रं त्याने तुला लिहली आहेत पण पाठवली नाहीत."रमेश कधी जाईल याचा नेम नाही तू त्याला भेटून यायला हवं".रमेशची आठवण गहरी झाली.डोळ्यात कृष्णा दाटून आली आणि तो काळ जसाच्या तसा आठवला. --------रमेश वाघमारे उर्फ रमेश खलाटीकर.सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात खलाटी म्हणून शंभर दीडशे उंबऱ्याचं हे गाव हा तिथलाच.संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात तमाशाचे फड जिंकणारा हा विनोदाचा बादशहा.सोंगाड्या ते शाहीर आणि ढोलकीपटू अशी रमेशची ओळख.छाया माया नागजकर यांच्या तमाशात त्याने काम केलं.मंगला बनसोडे यांच्या तमाशातही तो फार काळ होता.हा रमेश म्हणजे माझ्या आईचा सख्खा मावसभाऊ.याच्या संगतीनेच मी त्याकाळी अनेक जत्रेत तमाशा कलावंतांच्या घोळक्यात फिरलो.आज तमाशावर अनेकजण अभ्यास करत आहेत अनेक शोधनिबंधात रमेश खलाटीकर याचा उल्लेख केला आहे.या...

प्रेम कोणी कोणावर करावं

प्रेम कोणी कोणावर करावं प्रेम मनातील श्रीमंती वर करावं .।।धृ ।। प्रेमात असलेल्या प्रियसीला प्रेमाची जाणीव करून द्यावं  प्रेमात अडकवून प्रेमाची साक्ष द्यायला भाग पाडाव .।।१।।  चुकलो असेल प्रेमात कदाचित ,तर समजून घ्यावं  प्रेमातील आसवांना शिंपल्यातील  मोत्यां  प्रमाणे जपावं . ।।२।। राग येत असेल कदाचित परंतु माफ करून द्यावं  प्रेमात पडलो म्हणून प्रेमानेच समजवावं.।।३।।  प्रेमाचा अर्थ कदाचित समजला नसेल तुला .  खर सांगू प्रेमा मुळेच जीवनाचा अर्थ समजायला लागलाय मला. ।।४।। By Pushkar Baviskar

या स्वातंत्र्यचे काय होईल?

या स्वातंत्र्यचे काय होईल? तो आपले स्वातंत्र्य रक्षण करील कि पुन्हा गमावून बसेल ? हा माझ्या मनात पहिला प्रश्न उभा राहतो . भारत पूर्वी कधी स्वतंत्र देश नव्हता असे नाही . परंतु येथे असा मुद्दा उपस्थित होतो कि , त्याला एकेवेळी स्वातंत्र्य होते पण तो ते गमावून बसला . तो आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा गमावेल काय?देशाच्या भवितव्याबद्दल मला जास्त चिंताक्रांत करणारा हा प्रश्न आहे.  माझ्या मनाला जास्त टोचणी  जिची लागलेली आहे ती गोष्ट हि की  , भारताने आपले जे स्वातंत्र्य पूर्वी एकदा गमावले ते हिंदुस्थानच्या काही रहिवासांच्या कपटी कारस्थनामुळे ! हे सत्य हृदयाला असह्य वाटू लागते. महंमद बिन कासीम याने सिंधवर जेव्हा स्वारी केली तेव्हा सिंधचा राजा दाहीर यांच्या सेनापतींनी महंमद बिन कासिमच्या हस्तकांनी दिलेल्या लाचा स्वीकारल्या आणि दहार राज्याच्या बाजूने लढण्यास नकार दिला . भारतावर चाल करून येण्याचे आणि पृथ्वीराजाच्या विरुद्ध लढाई करण्याचे आमंत्रण जयचांदणे महंमद घोरीला दिले आणि या कार्यात मी स्वतः व सोळंकी घराण्यातील राजे तुला मदत करू असे जयचंदाने महंमद घोरीला आश्वासन दिले . शिवाजी म...